खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२५
खो-खोने वाढवली स्थानिक क्रीडा संस्कृतीची शान
नवी दिल्ली : बिहारमधील बोधगया येथील बीपार्ड मैदानावर सुरू झालेल्या
खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२५ मध्ये पारंपरिक भारतीय खेळ खो-खोने प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्रस्थान मिळवले
आहे. ५ मेपासून सुरू झालेल्या सामन्यांना शेकडो शालेय विद्यार्थी हजेरी लावत असून उत्साहात सामन्यांचा आनंद घेत आहेत.
४ मे ते १५ मेदरम्यान बिहारच्या पाच शहरांमध्ये – पटणा, राजगीर, गया, भागलपूर आणि बेगूसराय – होणाऱ्या या स्पर्धांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
खो-खो : जागतिक व्यासपीठावर स्थानिक क्रीडा संस्कृतीचे
प्रतिनिधित्व
खो-खो हा पारंपरिक खेळ जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा भारताचा
संकल्प WAVES समिट २०२५ मध्ये नव्याने अधोरेखित झाला. त्याचाच भाग म्हणून बीपार्ड
मैदानावर ९ राज्यांतील १६ संघ (८ मुलांचे व ८ मुलींचे) ५ ते ९ मेदरम्यान चुरशीचे सामने खेळत आहेत. या
स्पर्धेत २४० खेळाडू, १६
प्रशिक्षक, १६
व्यवस्थापक आणि सुमारे ४० तांत्रिक अधिकारी सहभागी असून भारतीय खो-खो महासंघाच्या सहकार्याने हे सामने दोन इनडोअर मॅट कोर्टवर आयोजित करण्यात आले आहेत.
प्रतिभावान खेळाडू घडविणारे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (NCOEs)
खो-खो आणि इतर पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण
राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांमध्ये
(NCOEs) दिले जात असून,
महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये क्रीडा कोटांतर्गत खो-खो खेळाडूंना प्रवेश दिला जातो.
याशिवाय,
सरकारी नोकऱ्यांमध्येही खो-खोतील कामगिरीच्या आधारे संधी
मिळत असून, त्यामुळे
अनेक युवक लहान वयातच या खेळात सहभाग घेऊ लागले आहेत.
सामन्यांचे गटविभाग :
मुलांचे गट :
गट अ : उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिशा, बिहार
गट ब : महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश
मुलींचे गट :
गट अ : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार
गट ब : कर्नाटक, ओडिशा, दिल्ली, तामिळनाडू
उपांत्य फेरी ८ मे रोजी, तर सामन्यांचे अंतिम सामने ९ मे रोजी खेळवले जाणार आहेत.
खो-खो खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेबाबत प्रतिक्रिया :
"खो-खो या खेळाने सध्या मोठी लोकप्रियता मिळवली असून,
नव्या पिढीमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. खेलो
इंडिया स्पर्धेमुळे अशा स्थानिक खेळांना उत्कृष्ट व्यासपीठ मिळते. हे खेळ
भारताच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक पातळीवर देशाची सौम्य
ताकद (Soft
Power) वाढवतात,"
- सुधांशु मित्तल,
अध्यक्ष,
भारतीय खो-खो महासंघ (KKFI)
या स्पर्धेमध्ये संघ व वैयक्तिक कामगिरीच्या आधारे एकूण
पदकांचे गुणांकन केले जाते. सर्वाधिक सुवर्ण पदके मिळवणारा संघ
एकूण विजेता ठरतो. खेलो इंडिया २०२४ चे आयोजन तामिळनाडूमध्ये झाले होते, ज्यामध्ये ५,६०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.


Post a Comment
0 Comments